अभ्यास सहल - छत्तीसगढ स्पेशल
जय जोहार.... जय जोहार ....जय जोहार... समजलात
का मित्रांनो.. अहो याचाच अर्थ आहे
नमस्कार.. छत्तीसगढ ला जाऊन आल्यानंतर
थोड्या छत्तीसगढी भाषेचा रंग मनावर चढला होता तो व्यक्त केला इतकच....! व्यावसाईक
समाजकार्याचे शिक्षण घेत असताना क्षेत्रीयकार्य, ब्लॉक प्लेसमेंट प्रशिक्षण,
उन्हाळी प्रशिक्षण शिबीर, संस्था भेटी याप्रमानेच द्वितीय वर्षाच्या
विद्यार्थ्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यातील संस्थाना भेटी
देण्यासाठी स्टडी टूर म्हणजेच अभ्यास सहलीचे आयोजन केले जाते. या वर्षी याच्या निम्मिताने छत्तीसगढ राज्याची
निवड केली होती. छत्तीसगढ राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर , २००० साली झाली.
प्रामुख्याने येथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र
आणि आदिवासी जमातींचे मुबलक प्रमाण यामुळे छत्तीसगढ राज्यास एक वेगळे वैभव प्राप्त
आहे. एका बाजूने या गोष्टी पाहता दुसऱ्या बाजूने मागासलेला पण सध्या कात टाकत
असणारा येथील आदिवासी हा विकासाच्या प्रवाहात यायला लागला आहे असे दिसून येते पण
काही नक्षलवादी भागाच्या छत्राखाली असणारा भाग हा विकासापासून वंचित आहे असे
म्हणावयास वावगे ठरणार नाही.
दिनांक १६ फेब्रुवारी, २०१८ रोजी आम्ही सांगली
कॅम्पस आणि पुणे कॅम्पस चे सर्व विद्यार्थ्यांनी मिळून छत्तीसगढ चा प्रवास चालू
केला. हा प्रवास माझ्यासाठी इतकासा नवीन नव्हता कारण मागच्या काही महिन्यात
प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने वर्धा येथे राहिलो होतो. पुणे पासून जो प्रवास
सुरु झाला तो नागपूर - गोंदिया मार्गे छत्तीसगढ मध्ये येऊन ठेपला. महाराष्ट्राचे
हे वैभव, हि निसर्गसंपत्ती जशी आहे तशी येथेही फुललेली दिसून आली. दुसरऱ्या दिवशी
रायपुरला पोचल्यानंतर महाराष्ट्र मंडळ मध्ये राहण्याची सोय केली होती तेथे सर्वजन
राहून पुढील भेटीचे नियोजन आखले.
आमची
पहिली भेट झाली ती ‘छत्तीसगढ महिला मंचला’ बस्तर नावाच्या कांकेर ह्या नक्षलवादी
भागातील ही आमची पहिली भेट. ग्रामीण भागाशी मी परिचित होतो पण संक्रमणाच्या अवस्थेतील
आदिवासी भाग पाहण्याची ही पहिलीच वेळ. येथे भेट देऊन त्यांच्या कामाची सविस्तर माहिती
घेतली. येथील काम प्रामुख्याने महिलांना रोजगार मिळवून देणे, त्यासाठी स्थानिक
संसाधनाचा वापर करणे, उदा – चिंच, आवळा, हिरडा, बेहडा यासारख्या घटकांपासून दुय्यम
पदार्थ बनवणे व त्याची विक्री करणे तसेच महिलांसाठी असणाऱ्या शिवणकाम प्रशिक्षण
केंद्राला सुद्धा आम्ही भेट दिली, येथे असे जाणवले की या संस्थांच्या हस्तक्षेपाने
येथील लोकांचे स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. लोक आपल्या गावातच
विविध व्यवसाय करताना दिसून येत आहेत. यासोबतच ‘जनपद पंचायत’ ही एक नवीन संकल्पना
पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी ‘छत्तीसगढ सेन्ट्रल सोशल वेल्फेअर बोर्ड’ ला भेट
दिली. केंद्र सरकार मार्फत चालवल्या या विभागास भेट देऊन महिलांसाठी असणाऱ्या
विविध प्रकल्पांची माहिती घेतली त्यातलेच एक म्हणजे ‘सखी वन स्टोप सेंटर’ म्हणजेच
महिला समुपदेशन केंद्र या प्रकारातील एक केंद्र. पण येथील विशेषत: अशी आहे की
महिला येथे आल्यावर तिच्या आरोग्याची सोय, राहण्याची सोय, पोलीस यंत्रणेतील
सहाय्य, विधी सेवा प्राधिकरनातील विधी सवलती या सर्व एकाच छताखाली पुरवल्या जातात
हे विशेष. पुढील भेट होती ती ‘मितवा प्रोजेक्ट’ ला ही भेट थोडीशी वेगळी होती. सदर
संस्था हि तृतीपंथींच्या हकासाठी काम करते. या संस्थेतील सर्व लोक हे तृतीयपंथी
आहेत हे विशेष. संविधानाने दिलेल्या अधिकाराबाबत आणि एक माणूस म्हणून जगताना
लागणारे हक्क यावर यांचे काम खूप चांगले आहे. प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य,
नोकरीमधील आरक्षण अश्या विविध मुद्यावर येथे काम चालते.


एका रविवारी आम्ही सर्व विद्यार्थी व
शिक्षण बिलासपुर येथील ‘कानन पेंडरी’ या प्राणीसंग्रालयास भेट देण्यास गेलो आणि
‘वंडर वर्ल्ड’ येथे सर्व मित्रांसोबत मौजमस्ती केली. अभ्यास सहलीच्या निम्मित्ताने
पुणे मधील आमच्या सर्व मित्रांची खूप चांगली ओळख झाली आणि खऱ्या अर्थाने समविचारी
लोकांच्यात रममान होण्याची संधी मला मिळाली. अश्या सर्व अर्थाने छत्तीसगढची अभ्यास
सहल मनाच्या पटलावर कोरलेली कधीही न विसरणारी स्मृती देऊन गेली.
No comments:
Post a Comment