Saturday, 4 April 2020

गोळाबेरीज.........



                                                            लेखक – प्रविण पारसे     
                                  
आज सकाळी सकाळी लवकर आवरून बाहेर पडायच्या घाईत असतानाच अचानक फोन खनानला.. पलीकडून आवाज आला ‘सर आज सुट्टी पाहिजे.’ त्या आवाजामागची काळजी आणि आर्त विनंती मला जास्त रोखून धरता आली नाही आणि मी लगेच होकार दिला. सुट्टी ची विनवणी करणं ती पण इतकी अचानक यापाठीमागे निच्छितच काही महत्वाचे कारण असू शकते हा अंदाज लावणे देखील मला गरजेचे वाटले नाही कारण मला निच्छित माहिती होता माझा स्टाफ कधीही या उत्तम नात्याचा गैरवापर करणार नाही. सदर ठिकाणी काम करत दीड वर्षे कधी उलटून गेली कळलीसुद्धा नाहीत. सुरुवात झाली ती एका पेपर मधल्या छोट्या जाहिरातीपासून आणि शेवट होतोय एका खूप मोठ्या परिवारापर्यंत. अर्थातच हा शेवट म्हणता येणार नाही ही तर एक नवीन दिशा आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही. निच्छित स्थळी जाण्यासाठी हमरस्त्यावरून योग्य त्या ठिकाणी आवश्यक ती वळणे घ्यावी लागतात त्यातीलच हे एक वळण.
मी नवखा असतानासुद्धा सगळ्याकडून मिळालेली त्यांच्या अनुभवाची शिदोरी कौतुकास्पद आहे. मनुष्याने आयुष्यभार शिकत राहीले पाहिजे या उक्तीप्रमाणेच नेहमी माझ्या स्टाफकडून जे काही मिळेल ते शिकत राहिलो आणि हळू हळू त्याची भली मोठी शिदोरी घेऊन येथवर पोचलो. या शिदोरीचे अनेक विविध पैलू आहेत. काही लोकांचा निरागसपणा, काहींचा संयम, काही व्यक्तीची काम करण्याची हातोटी, काहींच संभाषण, कुणाचं लिखाण अशा विविध गोष्टी मला या शिदोरीमध्ये ठेवण्यास मिळाल्या. शब्द देखील अपुरे पडतील असे बहुरंगी व्यक्तीसोबत काम करण्याची मजाच काही और.
आपले श्रीमान आजाराशी झुंज देत असताना देखील त्यांच्या सोबत तीन मुलांना सांभाळत उभारलेला संसार आणि त्यामागची धडपड पाहून डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. स्वतः एकटीने जिद्दीने आपल्या दोन मुलीना त्यांच्या पायावर उभे करताना केलेली कसरत आणि काटकसरसुद्धा कधी या नजरेतून सुटली नाही. घरच्यांचा म्हणावा तसा आधार नसताना देखील स्वत:च्या मुलाला जिद्दीने शिकवणारी आणि तेवढ्याच जिद्दीने शेतीवाडी कडे लक्ष देणारी, एकाच वेळी आई आणि आजी अशी दुहेरी भूमिका सांभाळणारी माणस मला मिळाली. काम हे काम न समजता हसत खेळत पूर्ण करून नेहमीच इरसाल आणि गावातल्या राजकारणात सक्रीय राहणारी मानस देखील पहावयास मिळाली. नवऱ्याचे आणि आता वडिलांचे छत्र हरवून देखील समाजकार्यास वाहून घेणाऱ्या रणरागीनीची भेट सुद्धा इथलीच. अस्सल गावरान ठेका साभाळत इंग्रजी येत नसताना सुद्धा खंबीरपणे कार्यरत असणारी व्यक्ती मिळण्यासाठी सुद्धा खूप मोठ भाग्य असाव लागत. आई - वडील आणि बायको – मुलगी या दोनही बाजूंचा समतोल सांभाळत कामात जीव ओतणारी मानस तीही इथलीच. गावाकडची शेती, घरदार सोडून काम आणि शिक्षण यासाठी बाहेर पडून भविष्यात  व्यावसायिक समाजकार्यात भरीव योगदान देण्यास समर्थ असणारे व्यक्तीदेखील मला माझ्या या कार्यकाळात बघायला मिळाल्या. आपल्या मुलाला मुंबईला शिक्षणासाठी पाठवून त्याला पाठिबा देत संसाराचा गाडा ओढत काम करणारी अभ्येद्य मानस देखील मला भेटली. अशा या वेगवेगळ्या व्यक्तीरेखांना सांभाळत हसत खेळत ही वेळ कशी निघून गेली तते कधी समजलच नाही. एकान म्हंटलय की वेळ ही नेहमी निघून जाण्यासाठीच असते. पण निघून गेलेली वेळी आपल्या आयुष्यात कशी सार्थकी लागून निघून गेली याची सुद्धा गोळाबेरीज आपण केली पाहीजे असं मला वाटत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणेच विविध व्यक्तीसोबत काम करत असताना मीही त्यांच्यात कधी एकरूप होऊन गेलो समजलच नाही. काहींचे खूप कटू अनुभव देखील जवळून पहिले आणि काहींचे हर्षोउल्हासित होणारे क्षणही अनुभवले. या सर्व अनुभावातून एक गोष्ट मात्र जाणवली की आपले वेगळेपण सिद्ध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपली एकरूपता सिद्ध केली तर निच्छितच आपले काम हे सार्थकी लागेल आणि केलेल्या कामाचे समाधान देखील मिळेल.
           भगवान गौतम बुद्ध म्हणाले होते, ‘अंदाज गलत हो सकता है लेकीन अनुभव नही’. या विधानाप्रमानेच त्यांच्याकडे असणाऱ्या अनुभवाचा, ज्ञानाचा यथार्थ वापर करण्यात मी यशस्वी झालो त्याला अर्थातच साथ मिळाली ती आपुलकीची आणि गोड नातेसंबंधांची. काही लोक म्हणतात की कामाच्या ठिकाणी नेहमी प्रोफेशनल (म्हणजेच व्यावसाईक) असलं पाहिजे, पण माझ्या अनुभवानुसार कामात व्यावसाईकपणा असावा पण त्याने जोडलेली माणसं दुरावता कामा नयेत. बोलण्यात गरजेनुसार कटुता असावी पण त्यामागची गोडी सुद्धा अनुभवता यावी. आतापर्यंतच्या आयुष्यात मी नेहमी विद्यार्थी या भूमिकेत वारंवार राहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी म्हणजे फक्त शाळेत जाऊन शिकणे या भावनेतून नाही तर आपल्याला भेटलेल्या व्यक्तीकडून नेहमी नवीन काही शिकता येईल का या उद्देशाने विद्यार्थी. इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत मी मित्र, विद्यार्थी, शिक्षक, भाऊ यासारख्या विविध भूमिकेत राहण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती ही कधीही वाईट नसते तर परिस्थिती त्या व्यक्तीस वाईट बनण्यास प्रोत्साहित करीत असते. इथे आजवर मिळालेल्या प्रेमाने जग देखील जिंकता येईल एवढी ताकद मनगटात साठवलेली जाणवते. आणि शेवटी मनगटात प्रेमाची ताकद जरी सामावली असली तरी विरहाचे अश्रू डोळ्यातून हालत नाहीत याची मनाला खूप भीती वाटते.     

No comments:

Post a Comment

गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...