Tuesday, 6 February 2018

धरामित्र, वर्धा





धरामित्र, वर्धा





आज खूप दिवसांनी ब्लॉग लिहिताना एक वेगळाच उत्हास जाणवत होता. व्यावसाईक समाजकार्याचे शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या माध्यमातून घेत असताना प्रथम वर्ष आणि चालू असणारे द्वितीय वर्ष या कालखंडात विविध सामाजिक संस्था पाहायला मिळाल्या. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, अपंग, निराधार, पर्यावरण, ग्रामीण विकास, महिला सबलीकरण हे विषय हाताळणाऱ्या बहुतांशी संस्था मी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या. प्रशिक्षण शिबीराच्या निमित्ताने (Block Placement Training)  विदर्भात जाऊन एखाद्या संस्थेत काम करायला मिळणे ही तशी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ठ आहे. आपण सर्वजन विदर्भाविषयी रोज बातम्या, वृत्तपत्रे, रेडीओ इत्यादी च्या माध्यमातून ऐकतच असतो, येथील शेतकरी व त्याच्या समस्या सर्वाना ठाऊकच आहेतच पण प्रत्यक्ष येथे कसे वातावरण आहे, समस्या व त्यावरील पर्याय काय आहेत ते इथे आल्यावरच मी व माझ्या टीमला याचे आकलन झाले. विदर्भातील वर्धा या जिल्ह्यातील वर्धा शहरात धरामित्र या संस्थेत आम्हास १ महिना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. प्रामुख्याने शेती व शेतकरी हा संवेदशील विषय येथे कसा हाताळला जातो व किती तळागाळापर्यंत जाऊन काम करावे लागते ते येथील कामामुळे मला समजू शकले. तर ‘धरामित्र’ या संस्थेविषयी मला जे उमगले ते मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.   
धरामित्र ही संस्था स्थापन करण्यापाठीमागचे कारण म्हणजे समाजातील बांधिलकी बांधणाऱ्या काही ध्येयवादी शास्त्रज्ञानी व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापलेली एक सेवाभावी संस्था होय. धरामित्र संस्था ग्रामीण भागात काम करते तसेच ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांची संवर्धन करते व त्यांच्या नायपूर्ण सुयोग्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व लोकांच्या सहभागाने शाश्वत विकास साधण्याचे कार्य धरामित्र संस्था करते.
तसेच संस्थेमध्ये विविध प्रकारचे संशोधन केले जाते ते म्हणजेच पर्यावरणपूरक उपकरणे व सेंद्रिय शेतीविषयक संशोधने धरामित्र संस्था करते. तसेच केळीच्या खोडापासून व गारमेंट च्या टाकाऊ वस्तू पासून कागद निर्मिती प्रकल्प या संस्थेने उभारला आहे. पालापाचोळा व कचऱ्या पासून कंपोष्ट खत येथे बनवले जाते, सोबतच सेंद्रिय शेतीविषयक जागरुकता व शेतीतील विविध संशोधने हि संस्था गेली २० वर्षे अविरतपणे करत आहे. डॉ. तारक काटे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील पर्यावरण शेतीविषयक विविध कार्ये या संस्थेमार्फत केली जातात.   
            शहरी व ग्रामीण भागात आवास व आरोग्य सेवेचा अभाव, शेतीची घटती उत्पादकता, पाण्याची समस्या, नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास, बेकारीचा भस्मासुर यासारखे प्रश्न अधिकच उग्र बनत चालले आहेत. योग्य व सुसंगत अश्या  तंत्रज्ञानाच्या वापरातून ग्रामीण प्रश्न सोडवता येतील का यासाठी धरामित्र हि संस्था इसवी सन १९८९ साली वर्धा येथे स्थान करण्यात आली. ग्रामीण भागासाठी निसर्ग सुसंगत उपयुक्त तंत्रज्ञान निर्मिती व प्रसार हे संस्थेचे ध्येय असून धरामित्र ने आतापर्यंत निसर्गाशी सुसंगत अश्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे.

संस्थेची उद्दिष्टे -

१. ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून त्यांच्या न्यायपूर्ण वापरातून सुयोग्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व लोकांच्या सहभागाने शाश्वत विकास साधणे.
२. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या शोधाच्या संदर्भात ग्रामीण लोकांच्या अडचणी ओळखणे.
३. समस्या निराकरणासाठी पर्यावरण – स्नेही तंत्रज्ञानाची निर्मिती करणे.
४. तळागाळात काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण लोकांसाठी अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.
५.  ग्रामीण जनतेच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाचे महत्व व संवर्धन याचे प्रबोधन करणे.
६. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गैर-सरकारी संस्थांच्या मदतीने ग्रामीण विकास साधणे.

धरमित्र संस्था हि विधार्भातील जिल्ह्यातील त्याचबरोबर मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यात काम करते. सध्या मात्र संस्था फक्त वर्धा जिल्ह्यात काम करत आहे. त्यातल्या त्यात वर्धा जिल्ह्यातील आर्वी व देवळी तालुक्यात एकूण११ गावात काम करत आहे. यामध्ये संस्थेचे जे लाभार्थी आहेत ते शेतकरी आहेत यामध्ये ३०८ शेतकर्यांचा समावेश आहे त्यातील २०२ शेतकरी हे आर्वी तालुक्यातील व १०६ शेतकरी हे देवळी तालुक्यातील आहेत. यामध्ये हे शेतकरी हे सेंद्रिय शेती करतात यासाठी संस्थेचे संचालक, प्रकल्प समन्वयक आणि २ क्षेत्रीय प्रेरकांचा समावेश केला आहे. 

सध्या कार्यरत असणारे विविध प्रकल्प -

१. पर्यावरणीय शेतीच्या माध्यामातून लहान शेतकऱ्यांची आजीविका सुधारणे (वर्धा इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट)

·        परसबाग लागवड प्रकल्प –

लहान शेतकरी, तसेच अल्प भूधारक व भूमिहीन शेतकरी किवा शेतमजूर लोकांनी घराच्या घरी किंवा  शेतावर परसबाग लागवड करून सेंद्रिय खताचा वापर करून घरच्या घरी आवश्यक त्या भाज्या पिकावाव्यात हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. गवारी, भेंडी, वांगी, मेथी, शेपू, चाकवत, चवळी, दोडका, कोहळा यासारख्या विविध पावसाळी तसेच हिवाळी पिकांचे बियाणे संस्थेमार्फत पुरवले जाते व त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांचे अहवाल ठेवले जातात व घरच्या घरी परसबागेत लोकांना रसायनमुक्त  भाजीपाला व फळभाज्या पिकवून सबल केले जाते. 

२. वनौषधी प्रक्रिया केंद्र –

            ह्या विभागामध्ये ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पतीपासून विवध प्रकारचे औषधी उत्पादने बनवली जातात. प्रामुख्याने मध संकलन येथे नैसर्गिक पद्धतीने केले जाते. मधाचे पोळे नष्ट न करता मध संकलन करून थेतील स्थानिक लोकांना रोजगार दिला जातो. हळद, मोहरी, गवती चहा यासारखे विविध प्रकारची औषधी तेले तसेच अडुळसा चूर्ण, सुगंधी आयुर्वेदिक उटणे,  शतावरी चूर्ण यासारखी उत्पादनेही येथे बनवली जातात.



           
३. अन्न व फळ प्रक्रिया केंद्र –
 
 अन्न व फळ प्रक्रिया केंद्रामध्ये विवध फळभाज्या पासून विविध उत्पादने बनवली जातात. यामध्ये टोमॅटो सॉंस, फळांचा जाम, अडूळसा चूर्ण, शतावरी चूर्ण, आर्युवेदिक उटणे यासारखी उत्पादने येथे बनवली जातात. यासोबतच आंबा लोणचे, आवळा लोणचे, लिंबू लोणचे यासारखी उत्पादने बनवली जातात व त्यांची विक्री केली जाते. यासोबतच ही उत्पादने बनवण्याठी प्रशिक्षण सुद्धा येथे दिले जाते.




 ४. हातकागद व केळीतंतू कागद निर्मिती केंद्र -

            या विभागामध्ये टाकाऊ कागदापासून तसेच केळीच्या खोडापासून कागद निर्मिती केली जाते. टाकाऊ वस्तूमध्ये खराब कागद, रद्दी, गारमेंट चे टाकाऊ घटक याचा येथे वापर होते. हा उद्योग येथे चालवून त्याच्यापासून विविध प्रकारच्या कागदांचे उत्पादन केले जाते व त्याची विक्री सुद्धा केली जाते. आणि त्याचे प्रशिक्षण सुद्धा गरजू युवकांना दिले जाते.

५. शेती संशोधन क्षेत्र –

           
साठोडा या गावात संस्थेची शेती आहे. येथे विविध प्रकारचे प्रयोग केले जातात. नवनवीन संशोधने येथील शेतावर केली जातात. नवीन पर्यावरण पूरक  शेती, सेंद्रिय खताची निर्मिती, बियाणे संवर्धन, आंतरपीक प्रयोग इत्यादी गोष्टी येथे केल्या जातात व शाश्वत शेतीची नवनवीन तंत्रे विकसित केली जातात.

६. माती परीक्षण केंद्र (कार्व्हर प्रयोगशाळा) -

Soil Testing Unit
            माती परीक्षण केंद्रामार्फत ग्रामीण भागातील शेतकर्याच्या शेतातील मातीचे अत्यंत कमी खर्चात मातीचे परीक्षण केले जाते. व मातीतील सेंद्रिय घटक तपासले जातात. विशिष्ट संगणकीय प्रणालीचा येथे माती परिक्षनासाठी वापर केला अतो. नत्र, स्फुरद, पालाश यासारख्या महत्वाच्या घटकांसोबातच सोडियम, लोह, तांबे, झिंक, बोरोन यासारख्या सूक्ष्म घटकांची येथे तपासणी येथे केली जाते. व त्यानंतर शेतकऱ्यास ती जमिन कोणत्या लागवडीसाठी योग्य आहे ते सांगितले जाते व त्यासाठी खतांचे किती प्रमाण लागणार ते सुद्धा सांगितले जाते.



७. शाश्वत शेती –

            धरमित्र हि संस्था वर्धा जिल्ह्याल आर्वी आणि देवळी तालुक्यात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती जोपासत आहे. लहान शेतकरी आर्थिक दृष्ट्या सबल व्हावेत व त्याच्या शेतीचे उत्पादन वाढावे आणि हि शेती रसायनांपासून मुक्त रहावी असा प्रमुख उद्देश या प्रकल्पाचा आहे. यामध्ये सेंद्रिय खताचा वापर, देशी बीजसंवर्धन, पशुपालन, परसबाग लागवड, पारंपारिक पिके, आंतरपीक पद्धती, मिश्र पिक पद्धती, पिक फेरपालट यासारखी उपक्रमे ही संस्था राबवत असते.


 
Photo With all staff members and founder of Dharmitra Dr. Tarak Kate sir

No comments:

Post a Comment

गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...