लेखक
– प्रवीण पारसे
नेहमीप्रमाणे
तो सोमवारचा कंटाळवाणा दिवस उजाडला. काही केल्या रविवारी केलेल्या आरामाचा क्षीण
अंगातून जाईना. तरी पण आळस झटकून नाईलाजाने मन मारून सगळेजण आपल्या आपल्या ओढीने
कामासाठी सकाळी बाहेर पडत होते. मी सुद्धा सकाळीच ऑफिसच्या कामाचे नियोजन करत
होतो. माझ्या वेळेनुसार अगदी घडळाच्या काठावर मी आवरत असतानाचा थोडासाच वेळ ऑफिस साठी बाकी असताना
अचानक आईने एक संगीतले आणि मनाची इच्छा नसताना पार्किंग मधून बाईक काढली आणि
त्यासाठी निघालो. मनात असंख्य विचारांचं काहूर. आज आठवड्याचा पहीला दिवस, कामाचे
नियोजन, मध्ये घड्याळाकडे लक्ष असे विचार
मनात चालू होते. आईने सांगितलेलं काम घाईनेच उरकून घरी जाऊन आवरून ऑफिस ला जायचं
या उद्देशानं थोडसं फास्ट गाडी चालवत घरी निघालो इतक्यात एका मावशीने माझ्या
गाडीला हात केला. साधारण ४० ते ४५ वय असलेल्या
त्या मावशी चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांनी थोड्याश्या जास्त वयाच्या व थकलेल्या जाणवत
होत्या. त्यांनी गाडीला हात केला हे मला लांबूनच समजले. ऑफिस ला होणाऱ्या घाईत आणि
हे काय नवीन म्हणून मी मनाशी थोडा चिडलो. शेवटी गाडी थांबवून त्यांना लिफ्ट द्यायचा
विचार केला आणि ब्रेक मारलाच. मी गाडी थांबवाताच त्यांच्या सुरकुतलेल्या व
काळजीयुक्त चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलेले माझ्या नजरेतून सुटू शकले नाही. काहीसा
विचार करत त्यांनी मला लगेच बाळा म्हणून हाक मारली आणि कुठे चालला आहेस मला थोड्या
आंतरावर सोडशील का अशी विचारणा केली.
त्यांच्या
बोलण्यावरून काहीश्या गोष्टी स्पष्ट उमजत होत्या त्या म्हणजे त्यांची परिस्थिती
मध्यमवर्गीय होती. साधारणता मनात असलेली घालमेल, विचारांचं काहूर, चिंता, काळजी हे
सगळेच पैलू त्यांच्या चेहऱ्यातून दर्शन देत होत्या. त्यांनी विचारणा केल्यावर बसा
काकी सोडतो तुम्हाला अशा आपुलकीच्या स्वरात त्यांना मी प्रतिसाद दिला आणि त्या
लगेच गाडीवर बसण्यास प्रयत्न करू लागल्या. पण माझी बाईक थोडीसी उंच असल्याने
त्यांना बसता येईना आणि त्या म्हणाल्या बाळ थोडे गुडघे दुखतात हल्ली म्हणून जरा
त्रास होतो. असे बोलून काहीसा शरीराला त्रास करून त्या गाडीवर बसल्या आणि गाडी मी
गाडी सुरु केली. मला काही अंतर गेल्यावर तमी त्यांना प्रश्न केला,”मावशी कुठून
आलात, आणि कुठे निघाला आहात?” त्यावेळी त्यांनी मिरज पासून जवळच असलेल्या एका
गावातून आल्याचे सांगितले आणि मिरजेतील एका ठिकाणी जायचे आहे आणि त्याचे कारण
म्हणजे देव. त्यांचा एक इष्टीत देवाला नारळ
अर्पण करण्यासाठी त्या इतक्या लांबून आल्या होत्या. अशी बरीच मुलभूत विचारणा
झाली असल्या त्यांनी मला विचरले काय करतोस तू सध्या बाळ, कुठे शिकतोस की नोकरी
करतोस? मी त्यांना सागितले आताच शिक्षण पूर्ण केले आणि सध्या नोकरी करतो. त्यावर लगेच
त्यांनी वेगळाच प्रश्न किला बाळा ही गाडी
किती रुपयाची आहे ? अचानक त्यांनी गाडी विषयी प्रश्न केला आणि मी थोडा विचारता
पडलो. मी विचार करत होतो तेवढ्यात त्या बोलल्या की माझ्या मुलाला गाडी घ्यायची अशी
साधारणता २ ते ३ वर्षे वापरलेली. त्या बोलल्या की त्यांच्या मुलाने गाडी पाहून पण
ठेवलीये आणि त्याला ३० हजार रुपये खर्च आहे. सध्या अडचण अशी आहे की ३० हजार उभारायचे
कुठून ? त्या मला सांगत होत्या की एक २ तोळ्याची अगठी आहे ती विकून मुलाला गाडी
घ्यायचा त्यांचा विचार होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बिनदिक्कत त्या मला सांगत
होत्या ? मी विचारात पडलो आणि मग माझ्या मनात सुद्धा विविध प्रश्न आले असे प्रश्न
की त्याच्या उत्तराशिवाय मी पुढे काहीच विचर करू शकणार नाही. मी त्यांना त्यांचा
मुलगा काय करतो ? त्याचे वय ? सध्या कोठे काम करतो का ? असे विविध प्रश्न विचरले
तर मला त्याचे खूप चिंताजनक उत्तरे त्या काकींच्या बोलण्यातून जाणवली ती अशी, त्या
म्हणाल्या मुलगा आता साधारण २२ वर्षे वयाचा आहे. सध्या बी.कॉम मधील राहिलेले विषय
सोडवत घरीच असतो सध्या, आणि एक दुर्देवी बाब अशी कळली की तो सध्या दिवसभर मोबाईलवर
काहीबाही करत घरीच असतो. आणि कामाला जा म्हंटले तर गाडी घेऊन दिली तरच कामाला जाईन
असे म्हणतो. त्याच्या वडिलांना आता काम करवत नाही आणि काम सहन ही होत नाही
तरीसुद्धा संसाराचा गाडा चालवायला ते एम.आय.डी.सी. मधील एका कारखान्यात कामाला
जातात आणि घर चालवतात. अशी काही उत्तरे ऐकून मी सुन्न झालो.
या
गोष्टी समजल्यावर मी त्यांना बोललो की मुलाला पहिला कुठेतरी त्याच्या कुवतीप्रमाणे
/ शिक्षणानुसार कामाला सुरुवात करायला
सांगा आणि त्याच्या स्वतःच्या पगारातून गाडी घ्यायला सांगा. म्हणजे त्याला पैशाची
किंमत कळेल आणि तुम्हाला आर्थिक बुर्दंड होणार नाही. तुमचे सोने किंवा तुमच्या
पुढील आयुष्यासाठी ठेवलेली अमानत अशी मुलांवर खर्च केलीत तर आयुष्याच्या शेवटच्या
क्षणी तुम्हाला स्वतःसाठी काहीच पैसे शिल्लक राहणार नाहीत आणि मग त्यावेळी
परिस्थिती खूप बिकट असेल असे काहीसे मी सांगत होतो इतक्यात त्यांना जिथे उतरायचे
होते ते ठिकाण आले त्यांनी मला खुणावून थांब असे सांगितले आणि त्या गाडीवरून
उतरल्या. माझ्याशी बोलल्यावर किंचित त्यांच्या मनावरचा ताण हलका झाल्यासारखे मला
जाणवले. “बर जाते मी बाळ इथून जवळच आहे मंदिर” असे म्हणून त्यांनी मला सावकाश जा
असे काळजीपोटी सांगितले आणि शेवटी माझ्याही मनातून “काळजी घ्या काकी” असा शब्द आला
आणि त्या प्रवासाचा शेवट झाला. आयुष्याची घडी सांभाळत स्वतःचा काडीमात्र सुद्धा
विचार न करणारी ती प्रेमळ माय पाठमोरी मला
दिसत होती आणि आईच्या या उद्दात कर्तुत्वाचे ज्ञान त्या व्यक्तीकडे बघून मला होत
होते. आयुष्यात खूप काही गोष्टी पहिल्या खूप गोष्टी अनुभवल्या पण स्वतः उपाशी
राहून आधी आपल्या लेकरांना पोटभर खायला घालणाऱ्या आईची सर जीवनातील कुठ्ल्यास
नात्याला येत नाही ते आज उभ्या डोळ्यांनी पहिले आणि अनुभवले.