Saturday, 24 November 2018

पूर्वजन्माची पुण्याई : आई



लेखक – प्रवीण पारसे

नेहमीप्रमाणे तो सोमवारचा कंटाळवाणा दिवस उजाडला. काही केल्या रविवारी केलेल्या आरामाचा क्षीण अंगातून जाईना. तरी पण आळस झटकून नाईलाजाने मन मारून सगळेजण आपल्या आपल्या ओढीने कामासाठी सकाळी बाहेर पडत होते. मी सुद्धा सकाळीच ऑफिसच्या कामाचे नियोजन करत होतो. माझ्या वेळेनुसार अगदी घडळाच्या काठावर मी आवरत  असतानाचा थोडासाच वेळ ऑफिस साठी बाकी असताना अचानक आईने एक संगीतले आणि मनाची इच्छा नसताना पार्किंग मधून बाईक काढली आणि त्यासाठी निघालो. मनात असंख्य विचारांचं काहूर. आज आठवड्याचा पहीला दिवस, कामाचे नियोजन, मध्ये घड्याळाकडे लक्ष  असे विचार मनात चालू होते. आईने सांगितलेलं काम घाईनेच उरकून घरी जाऊन आवरून ऑफिस ला जायचं या उद्देशानं थोडसं फास्ट गाडी चालवत घरी निघालो इतक्यात एका मावशीने माझ्या गाडीला हात केला. साधारण  ४० ते ४५ वय असलेल्या त्या मावशी चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांनी थोड्याश्या जास्त वयाच्या व थकलेल्या जाणवत होत्या. त्यांनी गाडीला हात केला हे मला लांबूनच समजले. ऑफिस ला होणाऱ्या घाईत आणि हे काय नवीन म्हणून मी मनाशी थोडा चिडलो. शेवटी गाडी थांबवून त्यांना लिफ्ट द्यायचा विचार केला आणि ब्रेक मारलाच. मी गाडी थांबवाताच त्यांच्या सुरकुतलेल्या व काळजीयुक्त चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलेले माझ्या नजरेतून सुटू शकले नाही. काहीसा विचार करत त्यांनी मला लगेच बाळा म्हणून हाक मारली आणि कुठे चालला आहेस मला थोड्या आंतरावर सोडशील का अशी विचारणा केली.
त्यांच्या बोलण्यावरून काहीश्या गोष्टी स्पष्ट उमजत होत्या त्या म्हणजे त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय होती. साधारणता मनात असलेली घालमेल, विचारांचं काहूर, चिंता, काळजी हे सगळेच पैलू त्यांच्या चेहऱ्यातून दर्शन देत होत्या. त्यांनी विचारणा केल्यावर बसा काकी सोडतो तुम्हाला अशा आपुलकीच्या स्वरात त्यांना मी प्रतिसाद दिला आणि त्या लगेच गाडीवर बसण्यास प्रयत्न करू लागल्या. पण माझी बाईक थोडीसी उंच असल्याने त्यांना बसता येईना आणि त्या म्हणाल्या बाळ थोडे गुडघे दुखतात हल्ली म्हणून जरा त्रास होतो. असे बोलून काहीसा शरीराला त्रास करून त्या गाडीवर बसल्या आणि गाडी मी गाडी सुरु केली. मला काही अंतर गेल्यावर तमी त्यांना प्रश्न केला,”मावशी कुठून आलात, आणि कुठे निघाला आहात?” त्यावेळी त्यांनी मिरज पासून जवळच असलेल्या एका गावातून आल्याचे सांगितले आणि मिरजेतील एका ठिकाणी जायचे आहे आणि त्याचे कारण म्हणजे देव. त्यांचा एक इष्टीत देवाला नारळ  अर्पण करण्यासाठी त्या इतक्या लांबून आल्या होत्या. अशी बरीच मुलभूत विचारणा झाली असल्या त्यांनी मला विचरले काय करतोस तू सध्या बाळ, कुठे शिकतोस की नोकरी करतोस? मी त्यांना सागितले आताच शिक्षण पूर्ण केले आणि सध्या नोकरी करतो. त्यावर लगेच त्यांनी वेगळाच प्रश्न किला बाळा ही गाडी  किती रुपयाची आहे ? अचानक त्यांनी गाडी विषयी प्रश्न केला आणि मी थोडा विचारता पडलो. मी विचार करत होतो तेवढ्यात त्या बोलल्या की माझ्या मुलाला गाडी घ्यायची अशी साधारणता २ ते ३ वर्षे वापरलेली. त्या बोलल्या की त्यांच्या मुलाने गाडी पाहून पण ठेवलीये आणि त्याला ३० हजार रुपये खर्च आहे. सध्या अडचण अशी आहे की ३० हजार उभारायचे कुठून ? त्या मला सांगत होत्या की एक २ तोळ्याची अगठी आहे ती विकून मुलाला गाडी घ्यायचा त्यांचा विचार होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बिनदिक्कत त्या मला सांगत होत्या ? मी विचारात पडलो आणि मग माझ्या मनात सुद्धा विविध प्रश्न आले असे प्रश्न की त्याच्या उत्तराशिवाय मी पुढे काहीच विचर करू शकणार नाही. मी त्यांना त्यांचा मुलगा काय करतो ? त्याचे वय ? सध्या कोठे काम करतो का ? असे विविध प्रश्न विचरले तर मला त्याचे खूप चिंताजनक उत्तरे त्या काकींच्या बोलण्यातून जाणवली ती अशी, त्या म्हणाल्या मुलगा आता साधारण २२ वर्षे वयाचा आहे. सध्या बी.कॉम मधील राहिलेले विषय सोडवत घरीच असतो सध्या, आणि एक दुर्देवी बाब अशी कळली की तो सध्या दिवसभर मोबाईलवर काहीबाही करत घरीच असतो. आणि कामाला जा म्हंटले तर गाडी घेऊन दिली तरच कामाला जाईन असे म्हणतो. त्याच्या वडिलांना आता काम करवत नाही आणि काम सहन ही होत नाही तरीसुद्धा संसाराचा गाडा चालवायला ते एम.आय.डी.सी. मधील एका कारखान्यात कामाला जातात आणि घर चालवतात. अशी काही उत्तरे ऐकून मी सुन्न झालो.
या गोष्टी समजल्यावर मी त्यांना बोललो की मुलाला पहिला कुठेतरी त्याच्या कुवतीप्रमाणे / शिक्षणानुसार  कामाला सुरुवात करायला सांगा आणि त्याच्या स्वतःच्या पगारातून गाडी घ्यायला सांगा. म्हणजे त्याला पैशाची किंमत कळेल आणि तुम्हाला आर्थिक बुर्दंड होणार नाही. तुमचे सोने किंवा तुमच्या पुढील आयुष्यासाठी ठेवलेली अमानत अशी मुलांवर खर्च केलीत तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला स्वतःसाठी काहीच पैसे शिल्लक राहणार नाहीत आणि मग त्यावेळी परिस्थिती खूप बिकट असेल असे काहीसे मी सांगत होतो इतक्यात त्यांना जिथे उतरायचे होते ते ठिकाण आले त्यांनी मला खुणावून थांब असे सांगितले आणि त्या गाडीवरून उतरल्या. माझ्याशी बोलल्यावर किंचित त्यांच्या मनावरचा ताण हलका झाल्यासारखे मला जाणवले. “बर जाते मी बाळ इथून जवळच आहे मंदिर” असे म्हणून त्यांनी मला सावकाश जा असे काळजीपोटी सांगितले आणि शेवटी माझ्याही मनातून “काळजी घ्या काकी” असा शब्द आला आणि त्या प्रवासाचा शेवट झाला. आयुष्याची घडी सांभाळत स्वतःचा काडीमात्र सुद्धा विचार न करणारी ती प्रेमळ  माय पाठमोरी मला दिसत होती आणि आईच्या या उद्दात कर्तुत्वाचे ज्ञान त्या व्यक्तीकडे बघून मला होत होते. आयुष्यात खूप काही गोष्टी पहिल्या खूप गोष्टी अनुभवल्या पण स्वतः उपाशी राहून आधी आपल्या लेकरांना पोटभर खायला घालणाऱ्या आईची सर जीवनातील कुठ्ल्यास नात्याला येत नाही ते आज उभ्या डोळ्यांनी पहिले आणि अनुभवले.

Thursday, 25 October 2018

लाल डब्याची नाळ


                                                       
लेखक – प्रविण पारसे

दिवस मावळनीला लागला होता, प्रवाशांची घरी परतण्याची लगबग दिसून येत होती. शाळेच्या पोरांची बस केव्हा लागते आणि कधी आपल्या गावी जातो ह्या गोष्टीची प्रचंड आस मनातून जाणवत होती. घसा कोरडा पडलेला असताना सुद्धा पाण्यासाठी गेल्यावर पुढील बस चुकेल म्हणून कित्येक लोक ऑक्टोंबर महिन्यातील त्या सूर्यदेवाच्या दाहकतेला सहन करत आतुरतेने लाल डब्याची वाट पाहत होते. सर्व महाविद्यालयीन तरुणी नेहमीप्रमाणे बस स्थानकाच्या एका ठराविक जागेत दाटीवाटीने जमा झालेल्या दिसल्या. वृद्ध महिला व पुरुष चवड्यावर बसून कपाळाला हात लाऊन दुरूनच गाडीची वाट पाहत स्वत:च तोंडाशी काहीतरी पुटपुटत घरी जाण्याच्या ओढीने कासावीस झालेले दिसत होत्या. मीही आज ऑफिस च्या कामानिम्मत जत च्या स्थानकावर होतो, कामाचा व्याप सकाळीच आवरला मग विचार केला आजोळी जाण्याच्या. जत पासून साधारण ३० ते ३५ किमी च्या अंतरावर माझे आजोळ. नेहमीप्रमाणे दुष्काळी भागाला शेतीच्या टंचाईप्रमाणेच दळनवळनाची सुद्धा टंचाई. या सर्व गोष्टीवर सर्वांचा भरवसा फक्त लाल डब्याच्या गाडीवर ते म्हणजेच आपले महामंडळ. लहानपणापासून या मार्गावर खूप प्रवास झाले, खूप काही पहिले अनुभवले फक्त आज हे सर्व मनातून कागदावर उतरवण्यासाठी हा लेखप्रपंच. 
इतक्यात बस स्थानकातील निरीक्षकाने माईक वर पुकारले की संबंधित गावी जाणारी बस संबंधित फलाट वर उभी आहे असे निरीक्षकाने पुकारताच एकाच कल्लोळ माजला लोक हातातील गाठोडी आणि पिशव्या सावरत फलाटाच्या दिशेने पळताना दिसत होते, पळत असताना निरीक्षक अजून त्या गाडी बद्दल काहिती माईक वर पुकारत आहे  याचेही त्यांना भान नव्हते. हे सर्व चालू असताना आतील वर्कशॉप मधील एक जुनी रंग उडालेली गाडी हळूहळू त्या फलाटाच्या दिशेने येत होती. गाडीचा उडालेला रंग आणि इंजिन आणि ब्रेक चा कर्कश आवाज त्या गाडीच्या उभ्या आयुष्यातील लोकसेवेची साक्ष देत होता. हे सर्व चित्र चालू असतानाचा गाडी येऊन थांबली तोच सर्वाची घाई त्या गाडीत चढायची ती गाडी होती जत ते इंचगिरीमठ या मार्गावरील, सदर मार्ग जत-वळसंग-शेड्याळ-दरीकोनुर-दारीबडची इत्यादी सर्व मार्गावर प्रवास करून ती तिचा टप्पा गाठणार होती.
            बस आल्यावर तोच बसच्या वाहकाने बसचा दरवाजा एका विशिष्ट कलेने उघडला तोच प्रवाश्याची आत चढन्याची घाई. महाविद्यालयीन तरुणांनी आधीच खिडकीतून रुमाल आणि कॉलेजची दप्तरे टाकून जागा बळकावल्या होत्या, इकडे महिला गाडीत जाण्यास धडपडत होत्या, हातातील दोन कापडी पिशव्या सांभाळत दुसरीकडे आपल्या बारक्या मुलाला पुढे करत गाडीत जागा मिळेल या आशेने महिलांची लगबग चालू होती. शाळेच्या आणि कॉलेजच्या मुली एका बाजूला थांबून पुरुषी अहंकाराला आधी वाट देत होत्या ते सर्व झाल्यावर त्या गाडीत गेल्या. या सर्व धांदलीत एक साधारण वयाने १८ ते १९ वय असलेला, घामाने चिंब भिजलेला पण चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असलेला मुलगा हातात उसाच्या रसाचे ग्लास घेऊन गाडीतल्या गर्दीत बिनदिक्कत शिरला जणू काय गाडी म्हणजे आपले घरच. तो गाडीत शिरताच कंडक्टरने कापाळाला आठ्या घालून फक्त त्याच्याकडे पहिले पण तो काही बोलला नाही. आपण या संकल्पनेला शहरी भाषेत म्हणतो म्युच्युअल अंडरस्टੱੱडिंग. बस च्या ड्रायव्हरने बस चालू केली आणि काही अंतर स्थानकाच्या बाहेर येताच एक नऊवारी साडी नेसलेली एक बाई तिच्या दोन लहान लेकरांसह एक छोटसं पोत सांभाळत गाडीच्या दिशेने पुढून पळत आली आणि तिने गाडीला हात केला, बस च्या वाहकाने काहीश्या नाराजीच्या स्वरानेच गाडीची बेल मारून तिला व त्या लहान पोरांना गाडीत घेतले. अश्या प्रकारे शेवटी गाडी जतच्या बाहेर पडलीच आणि मुख्य मार्गाला लागली तोच चालक आणि वाहकाने सुस्कारा सोडला. अजून एक खुओ मोठे दिव्य वाहकाला पार पाडायचे होते ते म्हणजे बसमधील सर्वाची तिकिटे काढणे होय, दिव्यचं ते ! इतक्या गर्दीत हे अवघड काम पार पडण्याचे ! तरीही मोठ्या चपळाईने आणि कन्नड भाषेचा वापर करून साधारण पंधरा एक मिनिटात त्याने लीलया हे काम पार पाडले. गाडी काही मिनिटांनी वळसंग या गावात पोचली तिथे पहिले तर मी थक्कच झालो. साधारण १७ ते १८ शाळेतील मुलींचा एक घोळका बसची आतुरतेने वात पाहत असताना दिसून आला. आता या सगळ्या मुली या बस मध्ये कश्या बसणार हा खूप मोठा प्रश्न प्रवाश्यांना भेडसावत होता, पण वाहकाने हे काम सुद्धा लीलया करून दाखवले.
अश्या प्रकारे हा प्रवास साधारण एका तासात माझ्या आजोळी येऊन थांबला व मी बस मधून बाहेर पडलो सूर्यदेव आता जवळपास झोपेच्या अधीन झाले होते त्यांनी त्यांची प्रखरता कमी केली होती. त्या मंद उजेडात पाठमोऱ्या लाल आकृतीकडे पाहत या महान सेवेस मनोमन शाबासकी देत मी घरी पोहोचलो. 

Tuesday, 24 July 2018

निवडणूक आणि अंधश्रद्धा - एक विचार


                    सध्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून सध्या सर्व भागांमध्ये सर्व पक्षातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराची घोडदौड सुरु केली आहे. तसे पाहता सध्याचे युग हे हायटेक म्हणजेच तंत्रज्ञानाचे युग समजतो.  निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडिया, टेलिव्हिजनस् यासारख्या नवनविन संकल्पना एकीकडे राबवत असतानाच दुसरीकडे पारंपारिक विचारांनी युक्त असलेल्या विचित्र घटना या वेळी पाहावयास मिळत आहेत.  दोनच दिवसामध्ये मिरज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टांगलेल्या एका काळया बाहूलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले व ती काळी बाहुली मिरजकरांच्या चर्चेचा विषय बनली.  सांगलीतील काही भागात देवाला प्रसाद वाहणे, करणी भानामती सारखे प्रयोग करणे, लिंबू-सुया यासारख्या विचित्र गोष्टींचा सर्रास वापर होताना उमेदवारांकडून होताना दिसत आहे.  कोणी आपल्यावर करणी करु नये, आपले उमेदवार एकनिष्ठ रहावेत, प्रतिस्पर्धीचा विजय होऊ नये यासारखी विविध कारणे सदर गोष्टीची पाळेमुळे आहेत.  सांगली मध्ये अंनिस सारख्या संस्थांनी वेळोवेळी याविशयी प्रबोधने व कार्यशाळा घेऊन सुद्धा लोकांच्या मानसिकतेत अपेक्षित बदल होताना दिसत नाहीत.
                      भारतीय संविधानामध्ये भाग 9(क) नुसार महानगरपालिका व त्यांचे कार्य तसेच एक भारताचा व्यक्ती म्हणून मतदानाचा हक्क आपल्याला दिला आहे या हक्काची परिभाषा व सदरच्या प्रकरणांची व त्यामागच्या कारणांचा जर लेखाजोखा केला तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची असलेली जबाबदारीची जाणीव काहीशी पुसट होत असल्याचे दिसून येते.  समाजसेवेचा विडा घेवून फक्त जनतेच्या कल्याणाचा विचार यापूर्वी केला असता तर ही आकस्मित भिती दाटून आली नसती.  शाहू, फुले, आंबेडकरांनी कर्मकांड मुक्त समाजाची स्वप्ने पाहीली होती या स्वप्नांना कुठेतरी खीळ बसल्याचे अशा काही गोष्टीतून जानवते.  एक सच्चा उमेदवार म्हणून फक्त आणि फक्त जनतेच्या कल्यानाचा विचार कसा करता येईल व त्यातून अपेक्षित बदल कसा साधता येईल आणि यातूनच हा समाज मतितार्थाने हे राष्ट्र कसे उन्नत बनवता येईल याचा सारासार विचार केला गेला पाहिजे तरच या महापुरुषांनी दिलेल्या बलिदानाचे सार्थक होईल.

Sunday, 18 March 2018

‘NGO Registration and Future’ Workshop conducted by PEF at Limb Village




‘NGO Registration and Future’ Workshop conducted by PEF at Limb Village

            Today dated 17th march, 2017 Planet Earth Foundation,Shirla took workshop on ‘NGO Registration and Future’ for the youth girls in limb village. Limb village is situated near Tasgoan in Sangli district. This area is mostly famous for production of grapes. The population of limb village is nearby 1200. Tilak Maharashtra vidyappeth, pune (Sangli campus) conducted the Participatory Rural appraisal (Rural camp) in previous month to make action plan after need identification of village. They find some problems through PRA. In that the priorities are alcoholism, Problems of farmers, women’s SHG, Livelihood Etc. To sort out the problems the young girls from this village want to make organization and through this they want to do some activities for the village through developmental approach to sustain their village.
            According to this we arrange the workshop with the help of my friends Swapnil Hingmire, Satyjit Nikam and Vishal Nalawade. In this workshop the following topics are discussed,



What is NGO ?
  • A non govwebmental Organization (NGO) is any non-profit, voluntry citizen’s group which is legally constituted, and work on a local, natioanl or international level.
  • The number of NGOs worldwide is estimated to be 3.7 million.
  • Russia has 2,77,000 NGOs.
  • China is estimated to have approximately 440,000 officially registered NGOs.
  • India is estimated to have had around 2 million NGOs in 2009.
Types of NGO’s : By orientation and level of operation
  • Charitable orientation
  • Service orientation
  • Empowering orientation
  • Community based Organizations
  • National NGO’S
  • International NGO’s
Acts for NGO’S while registration
  1. Societies Registration Act, 1860
  2. Bombay Public trusts Act,1950
Advantages of NGO’s
  • Ability to experiment freely
  • Flexible to work on local needs
  • Enjoy good rapport with people
  • Ability to communicate at all levels
  • Ability to recruit experts and highly motivated staff
  • Less restrictions from the Government
Disadvantages of NGO’s
  • Lack of funds
  • Lack of dedicated leadership
  • Misuse of funds
  • Lack of public Participation
  • Centralizations in Urban Areas
  • Lack of Coordination
Who helps the NGO sector
  • Funding Agencies
  • Corporate Companies
  • Secret Donors
  • Government Agencies
Areas of work
  • Health
  • Empowerment   ( Child, Women, handicaps, social handicaps)
  • Research
  • Environment
  • Education
  • Rural and Urban Development
  • Human rights
  • Agriculture
  • Superstition
What we want to do….
  • Need to honest
  • Need to dedicated persons
  • Need to transparency  to create confidence
  • A proper personal policy
Required process for change:


Group Discussion and Guidance
  • Planning
  • Analyzing
  • Staffing
  • Networking
  • Implementing
  • Monitoring
  • Evaluating
  • Sustaining
  • exiting

    Active Participation

गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...