Saturday, 16 December 2017

आदिवासी गोंड समाजाची बदलती परिभाषा



आदिवासी गोंड समाजाची बदलती परिभाषा

भारत हा विविधतेने नटलेला आहे असे आपण नेहमी म्हणतो पण जेव्हा या विविधतेचे प्रत्यक्ष दर्शन होते तेव्हा यातील प्रखरता डोळ्याने अनुभवता येथे खऱ्या अर्थाने भारत हा कसा वेगळा आहे आणि त्याने किती वेगवेगळ्या जातींना - जमातींना सामावून घेतले आहे ते प्रत्यक्षात पाहायला मिळते. सध्या काही दिवस प्रशिक्षण शिबीराच्या निमीत्ताने “ धरामित्र ” या संस्थेकडे विदर्भात काम करायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने आदिवासी समाज आणि त्याची स्थिती जवळून पाहता आली आणि त्याचा अभ्यास करता आला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात पाचोड आणि एकबुर्जी या गावातील आदिवासी समाज पहावयास मिळाला. ही गावे साधारण वर्धा शहरापासून ३० किमी अंतरावर वसलेली आहेत. पाचोड गावात कोलाम हा आदिवासी समाज जास्त प्राणावर राहतो तर येथील एकबुर्जी गावात ९० % गोंड समाज राहतो. एकबुर्जी गावात गोंड समाजातील एक युवक चांगला परिचयाचा झाला त्याचे नाव पंकज. पंकजकडून गोंड समाजाची बरीच माहिती मिळाली आणि या समुदायाविषयी जाणून घेता आले. 
गोंड जमातीचे प्रतिक

गोंड समाज हा प्रामुख्याने मध्य भारत म्हणजेच मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ या राज्यात जास्त प्रमाणावर वास्तव्यास आहे. असे म्हणतात की गोंड समाज हा पहिला भारतातील मूलनिवासी आहे म्हणजेच पूर्वीपासून भारतात गोंड आदिवासींची सत्ता होती ते भारताचे राजे होते. यामध्ये भिल्ल, माडिया, कोरकू, प्रधान, उरराव, राजगोंड इत्यादी गोत्रांचा समावेश होतो. त्यानंतर झालेले परकीय आक्रमण, स्थलांतर, ब्रिटीश सत्ता यासारख्या कारणांनी हे साम्राज्य लोप पावत गेले. ह्या समाजाची गोंडी हि बोलीभाषा आहे. पूर्वी हा समाज शिकार व शेती यावर जगत होता. पण सध्या शिकार हि संकल्पना लोप पावत असल्यामुळे त्याला मर्यादित स्वरूप आले आहे. सध्या फक्त शेती, पशुपालन व इतर रोजगार यावर हा समाज आर्थिक द्रुष्टीने अवलंबला आहे.
गोंड हि आदिवासी जमात निसर्गालाच देव मानते व निसर्गपूजा करते. यांच्या समाजाचे प्रतिक म्हणजेच एक चिन्ह आहे त्यामध्ये जल, अग्नी आणि जमीन हे तीन महाभूते प्रतीके म्हणून दाखवलेली आहेत यालाच गोंडवाना ध्वज असेही म्हणतात. यातूनच निसर्गाविषयी असणारी गोंड आदिवासी जमातीची आस्था दिसून येते. हा समाज मूर्तीपूजा मानत नाही तर निसर्गपूजा अग्रस्थानी मानतो. रावण हा गोंड समुदायाचा राजा होता असे म्हंटले जाते. यामुळे रावण राजाची पूजा येथे केली जाते. मोहाची फुले व त्याने पाणी शिंपडून येथे देवपूजा होते  आणि शेंदूर वगेरे न वापरता फक्त हळद येथे वापरली जाते. या समाजामध्ये ऐकून ७५० गोत्र आहेत. यातील प्रमुख गोत्र १२ आहेत याचा विचार सोयरिक जुळवताना म्हणजेच लग्न जुळवताना केला जातो. येथे सम – सम नंबरामध्ये म्हणजेच गोत्रामध्ये लग्न केले जात नाही तसेच विषम - विषम  गोत्रामध्ये सुद्धा लग्न केले जात नाहीत. (उदाहरणार्थ गोत्र १ व ३ मध्ये लग्न करता येत नाही व गोत्र २ व ४ मध्ये सोयरिक होत नाही.) असे काही नियमने या आदिवासी समुदायामध्ये आढळून येतात. या समुदायामध्ये पिळवा रंग हा शुभ मानला जातो. लग्नात प्रामुख्याने वधू पिवळे लुगडे आणि नवरदेव पांढरा बंगाली कुर्ता व पिवळा फेटा घालतो. गोत्राचे ७ लिंबू व मातीचे ७ मडके ठेऊन येथे पूजा मांडली जाते व याला फेरे घेऊन विवाह संपन्न होतो. तसेच लग्नात डोक्यावर अक्षता म्हणून तांदूळ न टाकता फुले टाकली जातात हे या समाजाचे वैशिष्ट आहे.
१९७१ साली सर्वोच्च नायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हा समाज हिंदू धर्मामध्ये गणला जात नाही हा स्वतंत्र धर्म आहे न्यायव्यवस्थेचे म्हणने आहे. सध्या हा समाज प्रगतीच्या वाटेवर येताना दिसून येतो आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमान यासारख्या गोष्टी बदलताना दिसून येत आहेत. तरीही अजून अपेक्षित बदल व प्रगती सध्या करण्यासाठी अजून चांगली धोरणे व कायदे करण्याची गरज भासत आहे. प्रामुख्याने या जमातीच्या उद्धारासाठी त्याची नक्की गरज काय आहे हे समजून घेऊन त्यावर धोरणे राबवने खुप महत्वाचे असल्याचे मला वाटते. यामुळे गोंड आदिवासी जमात नक्कीच विकासाच्या प्रवाहात येईल असे म्हणण्यात दुमत नाही.   



Monday, 4 December 2017

विदर्भाची पहिली भेट

विदर्भाची पहिली भेट


प्रमाण घाव्या माझा हा महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा....

या गोविंदाग्रजांच्या काव्य पंक्तीनुसार या आपला महाराष्ट्र नक्कीच असा काही वेगळ्या अनुभवाने नटलेला आहे असे मला नक्कीच म्हणायला आवडेल.  आज लिहिण्यासाठी खूप काही आहे ते म्हणजे पहिल्यांदा मी पाहिलेला विदर्भ या विषयावर. ३० डिसेंबर ला दुपारी मिरज रेल्वे स्टेशन ला रामराम म्हंटला तो एक महिन्यासाठी कारण खूप दिवसापासून मनात असलेले मध्य भारत भेटीचे स्वप्न साकार होणार असे दिसले. ज्या ट्रेन नि निघालो तिचे पण नाव महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणजे यातूनच प्रतीत होते कि महाराष्ट्र दर्शन यातून नक्कीच होणार आणि महाराष्ट्र च्या विविधतेबद्दल नक्कीच अनुभवायला मिळणार. प्रथम माझा म्हणजेच सांगली जिल्हा संपल्यावर गाडी सातारा – पुणे – अहमदनगर - औरंगाबाद - जळगाव - बुलढाणा - अकोला असे जिल्हे पार करत निम्माअर्धा महाराष्ट्र दाखवत आम्ही चौघेही वर्धा जिल्ह्या पोहोचलो मी असे म्हणेन कि गाडी औरंगाबाद ला गेल्यावर मराठवाडा आणि विदर्भाची अनुक्रमे सुरुवात झाली. खूप दिवसापासून खूप काही ऐकले होते ते आज पहावयास मिळाले. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे काही साहित्यीकांनी म्हटलेच आहे तसा काही भाग इथे पहावयास मिळाला. 




रेल्वे मधून येताना दूरवर पसरलेला सपाट मैदानी प्रदेश पाहायला मिळाला आणि शेतीच्या बाबतीत सध्याच्या हंगामातील तूर, कापूस हि नगदी पिके पाहायला मिळाली यावरूनच विदर्भातील शेतीच्या बाबतीत काही जाणून घेता आले. सलग तासाच्या प्रवासातून दुसऱ्या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास आम्ही सर्वजन वर्धा येथे पोचलो. ‘उशीर करून राहिले’, ‘कसा झाला प्रवास’, ‘कोठून येऊन राहिले तुम्ही लोक’ अशा काही प्रश्नांनी आमचे स्वागत झाले यावरून प्रथमता विदर्भातल्या भाषेचा प्रत्यय आला आणि आपल्या संतांनी पावन झालेल्या या भूमीत असलेले भाषा, संकृती, राहणीमान याचा एक सुंदर मिलाप दिसून आला.  वर्धा हा जिल्हा प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील दोन प्रसिद्ध ठिकाणे ती म्हणजे सेवाग्राम आणि पोवणार, सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींचा आश्रम आणि पोवणार येथे विनोबा भावेंचा आश्रम. हे दोन्ही आश्रम म्हणजे आपल्या इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे आहेत. विदर्भ हि संकल्पना मनात आली किंवा चर्चेला आली कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो इथला शेतकरी आणि त्याची स्थिती. विदर्भातला शेतकरी आणि आत्महत्या याचे समीकरणका जोडले आहे त्याचे काही दाखले येथे पाहायला मिळाले. प्रामुख्याने नगदी पिके घेण्याची वृत्ती, रासायनिक औषधांचा अतीवापारामुळे कस कमी झालेली जमीन कमी होत आलेले शेतीआधारीत पशुपालन, पर्यायी आर्थिक व्यवस्थेचा अभाव या काही गोष्टीमुळे ह्या समस्या असल्याचे काही प्राथमिक चर्चेतून स्पष्ट झाले पण तरीही हि परिस्थिती नक्की बदलेल या विचाराने व्यथित असणारा शेतकरी प्रवर्ग येथे पाहायला नक्की मिळेल. विदर्भ म्हंटले कि आठवते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पावन झालेले मोठे शहर म्हणजेच नागपूर होय. वर्धा पासून अगदी साधारण ७० ते ८० किमी च्या अंतरावर हे शहर आवर्जून पाहायला हवे. अशा काही गोष्टी माझ्या ह्या पहिल्या विदर्भ प्रवासात अनुभवास मिळाल्या अजून पुढील काही दिवसात येथील वेगळेपण, समाजरचना नक्कीच आनुभवन्यास व पहावयास मिळेल आशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठवाडा आणि विदर्भ याचे महाराष्ट्रातील असणारे अमूल्य स्थान अधोरेखित करतो.     

प्रविण पारसे
९५६११५१९८७ 

Wednesday, 22 November 2017

प्रशासनातील समाजकार्यकर्त्याची भूमिका



प्रशासनातील समाजकार्यकर्त्याची भूमिका

१५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. तत्पूर्वी ब्रिटीश राजवटीने भारतावर राज्य केले त्त्यातील काही गोष्टींचा विचार करता प्रशासन ही संकल्पना स्वतंत्रपूर्ण काळापासून अस्तिवात असल्याचे दिसते. स्वातंत्र प्राप्तीनंतर भारतीय संघराज्याने संविधानाचा स्वीकार केला व एका कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली. या पार्श्वभूमीनंतर भारताच्या सरकारने अर्थात लोकशाहीने लोकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा हक्क बहाल केला गेला व त्या प्रतिनिधींनी लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांच्या कल्याणासाठी विविध धोरणांची निर्मिती केली. साहजिकच या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी प्रशाकीय यंत्रणा अस्तिवात आली व धोरणांचे सेवेत रुपांतर करणारी यंत्रणा कार्यान्वित झाली.   
      प्रशासनचे काम उत्कृष्टरित्या होण्यासाठी काही वैज्ञानिक गोष्टी, प्रत्यक्ष क्षेत्रीयकार्यावरील संशोधन या गोष्टींची नितांत आवश्यकता भासू लागली पर्यायाने उत्कृष्ट प्रशासन व्यवस्थेची यासाठी तरतूद करण्यात आली. कालांतराने काही काळ अंमलबजावणीच्या दृष्टीने खूपच उत्कृष्ट होता पण त्यानंतर निधीचा तुटवडा, लोकांची उदासीन भूमिका, शासकीय कर्मच्याऱ्याची आळशी वृत्त्ती, फक्त संख्यात्मक कामांकडे लक्ष, योजनेतील त्रुटी या सर्व गोष्टीमुळे प्रशासन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले. यामध्ये व्यावसाईक समाजकार्यकर्त्यांची गरज प्रकर्षाने जाणवत होती. प्रामुख्याने विविध शासकीय योजनांची नियोजित अंमलबजावणी झाली कुशल मनुष्याची नितांत आवश्यकता आहे. यामध्ये एक व्यावसाईक समाजकार्यकर्ता म्हणून सामाजिक विकासाबाद्द्ल असणारी जाणीव खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष प्रशासकीय सेवेमध्ये असताना समाजकार्यकर्त्यास विविध कार्ये पार पाडावी लागतात. यामध्ये योजनांच्या व्यवस्थित  अंमलबजावणीसाठी योग्य मनुष्यबळाचा पुरेपूर वापर या यंत्रणेमार्फत करता येतो. प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेतील खऱ्या अर्थाने लाभार्थीस योजनांचा लाभ देण्याची सर्वात महत्वाची जबाबदारी हा समाजकार्यकर्ता पार पाडत असतो. प्रशासकीय यंत्रणा व प्रत्यक्षात समुदायामध्ये काम करण्यासाठी सर्वात महत्वाची गरज असते ती समन्वयकाची होय.

      सामाजिक संस्था म्हणजेच बिगर शासकीय यंत्रणा ही यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये समुदायामध्ये जनजागृती, प्रबोधन तसेच समुदायाचे संघटन या अत्यंत महत्वाच्या बाबींचा समावेश होतो. समुदायामधील लोकांचा सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा दृष्टीकोण हा नकारात्मक असतो. त्या नकारात्मक दृष्टीकोनाला सकारत्मक बनविण्यामध्ये समाजकार्यकर्त्याची भूमिका फार महत्वाची असते. पर्यायाने असे म्हणता येईल कि प्रश्न व त्याची यंत्रणा व प्रत्यक्ष लाभार्थी यामधील दुवा म्हणजे समाजकार्यकर्ता होय.
      शासनाने कायद्यात पारित केलेली धोरणे, कार्यक्रम, शासकीय परीपत्रकेतसेच विशेष गटासाठी असणाऱ्या योजनांचा सविस्तर अभ्यास करणे व त्याची प्रक्रिया समजून घेऊन जास्तीत जास्त ते कार्यक्रम लाभार्थी पर्यंत कसे पोहचवता येतील याचा कुशाग्र बुद्धिमत्तेने व लोककल्याणाच्या दृष्टीकोणातून समाजकार्यकर्ता विचार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतो. क्षमता बांधणी, प्रशिक्षण, मार्गदर्शन, चर्चासत्रे या काही विशिष्ठ गोष्टींचे यंत्रणेतील व्यक्तींना प्रशिक्षण देऊन शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सामाजकार्यकर्ता सतत कार्यशील असतो. समाजातील दुर्बल घटक व त्यासाठी विशेष कार्य करण्याची जबाबदारी समाजकार्यकर्ता पार पाडत असतो व या सर्व जबाबदारीमुळे प्रशासनातील समाजकार्यकर्त्याच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित होते.            
© Mr. Pravin Parse
MSW - Student 
Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune

Sunday, 5 November 2017

भारतातील प्रदूषण आणि पर्यावरण – एक आढावा


 

भारतातील प्रदूषण आणि पर्यावरण – एक आढावा

भारत हा कृषिप्रधान, विकसनशील तसेच पुरोगामी देश आहे. यामधील अजूनही काही विशेषणे आहेत की तीसुद्धा कमी पडतील एवढे काही या भारत देशाबद्दल सांगता येते. भारतातील प्रदूषण, पर्यावरच –हास या गोष्टींच्या विशेषणाचा तितक्याच गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. विकसनशील देशामध्ये विकसित देशांच्या तुलनेत अधिक कारखानदारी, उद्योगधंदे आहेत त्यामुळे साहजिकच सध्या सध्या प्रदूषणामध्ये एका धोक्याच्या पातळीवर भारत देश पोहचला असून त्यामुळे होणाऱ्या मृत्युचा आकडा हा भयानक आहे.
      प्रदूषणामुळे झालेल्या मृत्युंच्या बाबतीत भारत १८८ देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. २०१५ साली जगभरात प्रदूषणामुळे सुमारे ९० लाख लोकांचा बळी गेलेला आहे, त्यातील तब्बल २५ लाखापेक्षा जास्त बळी हे भारतातील आहेत म्हणजेच साधारण २८ टक्के इतके मृत्यू हे भारतातील आहेत ह्या गोष्टीचे चिंतन आणि मनन झाले पाहिजे फक्त चिंतन आणि मनन नकोच तर त्यावर कठोर पावलेदेखील उचलली गेली पाहिजेत.
गुजरातमधील चिपको आंदोलन हे इतिहासातील पर्यावारणाच्या चळवळीमधीलमधील एक महत्वाची घटना मानली गेली पाहिजे अशा चळवळीमधूम इतिहासातील काही गोष्टीपासून पर्यावरणवादी विचार जगासमोर येत गेले. भारतातील फक्त काही टक्केच लोक पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येते. सध्या प्रदुशनामुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. कारखानदारी व उद्योगधंद्यांच्या विकासामुळे किंवा वाढत्या प्रभावामुळे नदी प्रदूषणाचे स्तोम माजले आहे. येथून पुढे जन्मणार्या पिढ्यांना कधी काळी भारतातील नद्या स्वच्छ होत्या हे सांगून देखील पटनार नाही. वायू प्रदुषणामधून तर कितीतरी पटीने विषारी वायू विषारी धातूचे कण हवेच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करत आहेत. यासोबतच तापमानवाढ तसेच अन्न प्रदुषण या गोष्टी सुद्धा विचारात घेतल्या पाहिजेत. प्रदुषणावरती कार्य करत असताना ते शाश्वत कसे करता येईल व चिरंतन विकासामध्ये भारताला कसे आणता येईल याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. फक्त पर्यावारावादी संस्थांनीच याचा पुढाकार घेऊन उपयोग नाही तर यामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाने जाणीवपूर्वक सहभाग घेतला पाहिजे. संविधानाच्या मुलभूत हक्कामध्ये मानवाला जगण्याचा हक्क बहाल केला आहे. या प्रदुषणामुळे या हक्कावरच आता गदा आली आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.


          प्रामुख्याने भारतीय सामाजव्यवस्थांमध्ये असाणारे स्थरीकरण या संकल्पनेवर प्रभाव दिसून येतो. प्रामुख्याने मध्यमवर्गीय लोक यामध्ये जास्त इच्छुक दिसून येत नाहीत. यात आम्ही काय करू शकत नाही, याचा आम्हाला काय फायदा, सरकारने सर्व करावे अशी भूमिका या स्तराची आहे. या कमकुवत विचारसारणीमुळे आपण आतापर्यंत पर्यावरण संरक्षणावर ठोस पावले उचलू शकलो नाही. भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा - १९८६, जलप्रदुषण नियंत्रण कायदा – १९७४ व वायुप्रदूषण नियंत्रण कायदा – १९८० यासारखे विविध कायदे अस्तिवात असतानादेखील शासःकीय पातळीवर हे कायदे फक्त कागदावरतीच राहिले असे प्रकर्ष्याने दिसून येते. या कायद्याची कडक अंमलबजावणी केली तर खऱ्या अर्थाने होणारी ‘मानवाची कत्तल’ आपल्याला थांबवता येईल. या कायद्यासोबातच शासनातर्फे विविध कार्यक्रम राबले जातात पण यामध्ये ब-याच त्रुटी असतात तर या त्रुटी नष्ट करून हे कायदे व धोरणे कशी मजबूत बनवता येतील व धोरणात्मक निर्णय घेऊन शासनाने त्यांची जबाबदारी पार पडण्याची गरज या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.
            एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपले कर्त्यव्य पार पाडून प्रदूषणमुक्त भारत साकारण्यामध्ये आपले योगादान देणे महत्वाचे आहे. मग येथे संविधानातल्या मुलभूत हक्कांप्रमाणेच मुलभूत कर्तव्याना देखील न्याय मिळेल व एक आदर्श राष्ट्र तयार होण्यामध्ये आपला हातभार लागेल हे नक्की.



प्रवीण दाजीबा पारसे
9561151987
एम.एस.डब्लू. द्वितीय
समाजकार्य विभाग
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे



गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...