विदर्भाची पहिली भेट
प्रमाण घाव्या माझा हा महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा....
या गोविंदाग्रजांच्या काव्य पंक्तीनुसार या आपला
महाराष्ट्र नक्कीच असा काही वेगळ्या अनुभवाने नटलेला आहे असे मला नक्कीच म्हणायला
आवडेल. आज लिहिण्यासाठी खूप काही आहे ते
म्हणजे पहिल्यांदा मी पाहिलेला विदर्भ या विषयावर. ३० डिसेंबर ला दुपारी मिरज
रेल्वे स्टेशन ला रामराम म्हंटला तो एक महिन्यासाठी कारण खूप दिवसापासून मनात
असलेले मध्य भारत भेटीचे स्वप्न साकार होणार असे दिसले. ज्या ट्रेन नि निघालो तिचे
पण नाव महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणजे यातूनच प्रतीत होते कि महाराष्ट्र दर्शन यातून
नक्कीच होणार आणि महाराष्ट्र च्या विविधतेबद्दल नक्कीच अनुभवायला मिळणार. प्रथम
माझा म्हणजेच सांगली जिल्हा संपल्यावर गाडी सातारा – पुणे – अहमदनगर - औरंगाबाद -
जळगाव - बुलढाणा - अकोला असे जिल्हे पार करत निम्माअर्धा महाराष्ट्र दाखवत आम्ही
चौघेही वर्धा जिल्ह्या पोहोचलो मी असे म्हणेन कि गाडी औरंगाबाद ला गेल्यावर
मराठवाडा आणि विदर्भाची अनुक्रमे सुरुवात झाली. खूप दिवसापासून खूप काही ऐकले होते
ते आज पहावयास मिळाले. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे काही साहित्यीकांनी म्हटलेच
आहे तसा काही भाग इथे पहावयास मिळाला.
रेल्वे मधून येताना दूरवर पसरलेला सपाट
मैदानी प्रदेश पाहायला मिळाला आणि शेतीच्या बाबतीत सध्याच्या हंगामातील तूर, कापूस
हि नगदी पिके पाहायला मिळाली यावरूनच विदर्भातील शेतीच्या बाबतीत काही जाणून घेता
आले. सलग तासाच्या प्रवासातून दुसऱ्या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास आम्ही सर्वजन
वर्धा येथे पोचलो. ‘उशीर करून राहिले’, ‘कसा झाला प्रवास’, ‘कोठून येऊन राहिले
तुम्ही लोक’ अशा काही प्रश्नांनी आमचे स्वागत झाले यावरून प्रथमता विदर्भातल्या
भाषेचा प्रत्यय आला आणि आपल्या संतांनी पावन झालेल्या या भूमीत असलेले भाषा,
संकृती, राहणीमान याचा एक सुंदर मिलाप दिसून आला. वर्धा हा जिल्हा प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील
दोन प्रसिद्ध ठिकाणे ती म्हणजे सेवाग्राम आणि पोवणार, सेवाग्राम येथे महात्मा
गांधीजींचा आश्रम आणि पोवणार येथे विनोबा भावेंचा आश्रम. हे दोन्ही आश्रम म्हणजे
आपल्या इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे आहेत. विदर्भ हि संकल्पना मनात आली किंवा
चर्चेला आली कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो इथला शेतकरी आणि त्याची स्थिती.
विदर्भातला शेतकरी आणि आत्महत्या याचे समीकरणका जोडले आहे त्याचे काही दाखले येथे
पाहायला मिळाले. प्रामुख्याने नगदी पिके घेण्याची वृत्ती, रासायनिक औषधांचा अतीवापारामुळे
कस कमी झालेली जमीन कमी होत आलेले शेतीआधारीत पशुपालन, पर्यायी आर्थिक व्यवस्थेचा अभाव
या काही गोष्टीमुळे ह्या समस्या असल्याचे काही प्राथमिक चर्चेतून स्पष्ट झाले पण तरीही
हि परिस्थिती नक्की बदलेल या विचाराने व्यथित असणारा शेतकरी प्रवर्ग येथे पाहायला
नक्की मिळेल. विदर्भ म्हंटले कि आठवते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने
पावन झालेले मोठे शहर म्हणजेच नागपूर होय. वर्धा पासून अगदी साधारण ७० ते ८० किमी
च्या अंतरावर हे शहर आवर्जून पाहायला हवे. अशा काही गोष्टी माझ्या ह्या पहिल्या
विदर्भ प्रवासात अनुभवास मिळाल्या अजून पुढील काही दिवसात येथील वेगळेपण, समाजरचना
नक्कीच आनुभवन्यास व पहावयास मिळेल आशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठवाडा आणि
विदर्भ याचे महाराष्ट्रातील असणारे अमूल्य स्थान अधोरेखित करतो.
प्रविण पारसे
९५६११५१९८७
No comments:
Post a Comment