Sunday, 16 June 2019

करिअर निवडताना...


                                                                                                                                                    लेखक – प्रवीण पारसे
                        


                            आज सकाळपासून ऑफिसच्या कामात गर्क होतो तेवढ्यात माझा फोन वाजला एका मित्राने नुकतेच १२ वी पास केले होते आणि त्याला BA च्या प्रवेशप्रक्रियेतील विषय निवडीबद्दल माझ्याकडून मार्गदर्शन हवे होते, त्याअंती एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ती म्हणजे करिअरच्या वाटा निवडताना विध्यार्थ्यामध्ये असणारा संभ्रम. हा सावळा गोंधळ सावरण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस उपयोगी पडेल या अपेक्षेनं साकारलेला हा लेखप्रपंच.
                        सध्या मे महिना उलटून गेला आणि जूनही मध्यात आला आहे आणि हा काळ निसर्गाच्या मान्सूनच्या अल्ल्हाददायी आगमनाबरोबरच विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सुद्धा महत्वाच्या काळापैकी एक असे आवर्जून म्हणावे लागेल, त्याचे कारणही तसेच कारण या कालावधीमध्ये विद्यार्थ्याच्या आयुष्यातील करिअरची दिशा आणि दशा याच कालावधीत निश्चित होत असते. सध्या १० वी, १२ वी, नीट, जेईई यासोबतच इतर बऱ्याच परीक्षेंचे निकाल जाहीर झाले आहेत त्यामुळे सध्या सगळीकडेच पुढील शिक्षणासाठीची अडमिशनस् ची धावपळ सर्वत्र दिसून येत आहे. १० वी झालेल्या बऱ्याच विध्यार्थ्याच्या मध्ये खूप सारे गैरसमज आढळून येतात त्यापैकी काही म्हणजे ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले तर विज्ञान शाखेत प्रवेश त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर वाणिज्य आणि मग कला असा पसंतीक्रम १० वी च्या मार्कांवर ठरवला जातो मुळात असा पसंतीक्रम ठरवण्यापेक्षा आपला पाल्य भविष्यात काय करू इच्छितो यांचे अध्ययन जर पालकांनी केले तर निश्चितच पाल्याच्या आवडीच्या विषयात त्याला करिअर करता येऊ शकते भले त्याचे दहावीचे मार्क कितीही असोत. उच्च माध्यमिक शिक्षणाच्या निवडीत नेहमी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली  पाहिजे ती म्हणजे विद्यार्थ्याच्या आवडी निवडी काय आहेत त्या जाणून त्या संबंधित सर्व शिक्षण शाखांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यास दिली गेली पाहिजे अर्थातच त्यामध्ये असणाऱ्या काठीण्य पातळीविषयी सुद्धा विद्यार्थ्यास अवगत केले पाहिजे.
                        करिअरचे मार्ग निवडताना फक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकिली इत्यादीचा विचार न करता व्यावसयभिमुख  शिक्षणावर सुद्धा आवर्जून लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही अभ्यासक्रम हे कमी कालावधीचे असून ते व्यावसायिक दृष्टिकोनातील असल्यामुळे नोकरीची हमी मिळवून देऊ शकतात. फाईन आर्ट्स, पेंटिंग, मूर्तीकला इत्यादीसारख्या विषयात सुद्धा आपल्या आवडीनुसार करिअरची निवड करता येऊ शकते. पारंपारिक वाटा सोडून कृषी अभ्यासक्रम, समाजकार्य क्षेत्र, स्पर्धा परीक्षा तसेच सध्या भारताच्या विकासाच्या अवस्थेत उपयोगी पडणारे तंत्रज्ञान याचा अभ्यास यासारख्या विविध गोष्टींचा आपण अगत्याने विचार केला पाहिजे.
                        Passion to Profession या इंग्रजी उक्तीप्रमाणे करिअरच्या वाट निवडताना आपण अगदी चोखंदळ राहील पाहिजे. बाजारातून भाजी आणताना सुध्दा आपण त्याची योग्य पारख केल्याशिवाय खरेदी करत नाही मग करिअरचा विचार करताना दुसऱ्याने केले म्हणून आपण ते का करायचे हा माझा सवाल ? लोक काय म्हणतील या भावनेला त्याच क्षणी नष्ट करता आले पाहिजे. लोक काय म्हणतील याहीपेक्षा आपले भविष्य या करिअर म्हधून कसे घडेल यातून आपला चरितार्थ कसा चालेल, आपण केलल्या कामाचे आपल्याला समाधान मिळेल का नाही या गोष्टीचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे आणि त्यातूनच आपल्या करिअर ची निवड केली आहे.


गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...